What is Shimla Agreement: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मोठे पाऊल उचलले आहे आणि सिंधू पाणी करार स्थगित केले आहे. याशिवाय, भारताने अनेक पावले उचलली आहेत, ज्यात पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देणे आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे समाविष्ट आहे. यामुळे पाकिस्तान नाराज झालाW आहे.
पंतप्रधान शाहनवाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली. यामध्येही पाकिस्तानने भारताने प्रत्युत्तरादाखल उचललेल्या पावलांचीच जवळपास समान पावले उचलली आहेत. त्यांनी शिमला करार स्थगित करण्याची धमकी दिली आहे. हा शिमला करार नक्की काय आहे (What is Shimla Agreement) जाणून घेऊया सविस्तर पणे.
What is Shimla Agreement: भारत-पाकिस्तानने शिमला करारावर कधी स्वाक्षरी केली?
भारताने मार्च १९७१ मध्ये लष्करी हस्तक्षेप करून पूर्व पाकिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे केले आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश नावाचा एक नवीन देश स्थापन केला. बांगलादेशमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. भारताने सुमारे ९० हजार लोकांना युद्धकैदी म्हणून नेले होते. त्यापैकी बहुतेक सैनिक किंवा निमलष्करी दलाचे कर्मचारी होते. भारताने पश्चिम पाकिस्तानमधील सुमारे ५,००० चौरस मैल क्षेत्रावर कब्जा केला होता.
शिमला करारावर कोणी स्वाक्षरी केली?
सुमारे १६ महिन्यांनंतर, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि तत्कालीन पाकिस्तानचे अध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांची हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे भेट झाली. दोन्ही नेत्यांनी २ जुलै १९७२ रोजी तेथे एका करारावर स्वाक्षरी केली. या कराराला आपण ‘शिमला करार (Shimla Agreement)‘ म्हणून ओळखतो. या करारात, दोन्ही देशांनी शांततापूर्ण मार्गाने आणि संवादाद्वारे त्यांचे मतभेद सोडवण्याची वचनबद्धता व्यक्त केली होती. त्याचा उद्देश शांतता राखणे आणि संबंध सुधारणे हा होता. ज्यात 5 महत्वाचे नियम बनवण्यात आले होते आणि ते दोन्ही देशांना मान्य आहेत.
शिमला करारात काय आहे?
या कराराद्वारे, भारत आणि पाकिस्तानने ठरवले की दोन्ही देश परस्पर संवादाद्वारे कोणताही वाद सोडवतील.
कोणताही तिसरा देश किंवा संघटना यामध्ये हस्तक्षेप करणार नाही.
कोणताही देश काश्मीरमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा एकतर्फी बदलणार नाही. दोन्ही देश त्याचा आदर करतील.
दोन्ही देश एकमेकांविरुद्ध हिंसाचार, युद्ध किंवा खोटा प्रचार करणार नाहीत, दोघेही शांततेत राहतील आणि त्यांचे संबंध सुधारतील.
भारताने ९० हजार पाकिस्तानी युद्धकैद्यांना सोडले आणि व्यापलेली जमीन मुक्त केली. पाकिस्तानने काही भारतीय सैनिकांनाही सोडले.
या करारामुळे काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर जाण्यापासून रोखला गेला. भारताचा युक्तिवाद असा आहे की काश्मीर मुद्दा भारत आणि पाकिस्तानमधील आहे.
हेही वाचा:
LSG vs DC: केएल राहुल ने रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज..!